पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅंड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) आणि जॉबीझा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल युगातील नोकरी क्रांती आणि कौशल्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
‘कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे चर्चासत्र १० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता पौड फाटा, एरंडवणे येथील ‘आयएमईडी’ येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘आयएमईडी’चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.
या चर्चासत्रात ऑटोलाइन इंडस्ट्रीज लिमिटेडचे महाव्यवस्थापक जितेंद्र सोनार, ह्युंडाई कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे एचआर प्रमुख उद्धव जोशी, नॉर ब्रेमेझ टेक्नॉलॉजी सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे नीरज गुप्ता प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चर्चासत्राविषयी :
दिवस : शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : आयएमईडी, भारती विद्यापीठ, मोरे विद्यालय कॅंपस, पौड फाटा, एरंडवणे.